शेतकरी कर्जमाफी 2026: संपूर्ण माहिती, पात्रता - “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना”
महाराष्ट्र सरकारने 2026–27 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा जाहीर केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. सरकारच्या या योजनेला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” असे नाव देण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारकडून २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, अंदाजे लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार. या योजनेमुळे राज्यातील सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी
सरकारने फक्त कर्जमाफीच नाही तर प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे.
वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना
५०,००० रुपये प्रोत्साहन अनुदान
कर्जमाफीसाठी पात्रता (Eligibility)
सरकारने काही अटी जाहीर केल्या आहेत. खालील शेतकरी या योजनेसाठी पात्र असू शकतात:
पीक कर्ज घेतलेले शेतकरी
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले कर्ज
बँक किंवा सहकारी संस्थेकडून घेतलेले कर्ज
राज्य सरकारने ठरवलेल्या इतर अटी पूर्ण असणे
या योजनेअंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ केले जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
अफवांवर विश्वास ठेवू नका
सरकारी वेबसाइट किंवा अधिकृत घोषणा तपासा
कर्जमाफी यादी जाहीर झाल्यावर आपले नाव तपासा



